वेब सीरीज रुद्र द एज ऑफ डार्कनेस का ट्रेलर रिलीज(“Rudra - The Edge of Darkness"). इस वेब सीरीज से अजय देवगन (Ajay Devgn, Digital Debut) कर रहे हैं डिजिटल डेब्यू. रुद्र में अजय एक बार फिर कॉप लुक में नजर आ रहे हैं . अजय के अलावा में राशि खन्ना (Raashi Khanna), ईशा देओल (Esha Deol), अतुल कुलकर्णी, अश्विनी कालसेकर, तरुण गहलोत, आशीष विद्यार्थी और सत्यदीप मिश्रा प्रमुख भूमिकाओं में नज़र आएंगे. ‛रुद्र- द एज ऑफ डार्कनेस’ ब्रिटिश वेब सीरीज ‘लूथर’ की रीमेक है. ('Rudra - The Age of Darkness' is a remake of the British web series 'Luther'.)
2014 लोकसभा निवडणुकीत बीजेपीने नरेंद्र मोदी यांच्या बळावर सर्वोत्कृष्ट कामगिरी करत सत्ता मिळवली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस या मजबूत पक्षाला पराभूत करून इतिहास रचला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती बीजेपीने 2017 मध्ये पाच राज्यांच्या निवडणुकीत केली आहे. 5 राज्यांपैकी 2 राज्याच्या विधानसभा निवडणुकीत बीजेपी ने यश मिळवले आहे.
2017 च्या उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर, गोवा, उत्तराखंड या राज्यातील निवडणुका महत्वाच्या ठरल्या होत्या, कारण 2014 मध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काही निर्णयाची टीका करण्यात आली होती तर काहींची प्रशंसा करण्यात आली होती. नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यापूर्वी घेतलेला नोटबंदीचा निर्णय चुकीचा आहे असे सांगण्याचा प्रयत्न एकंदरीत सर्व पक्षानी केला परंतु लोकांनी नोटबंदी च्या निर्णयाला समर्थन दिले. नोटबंदीच्या काळात लोकांना आपले रुपये बँकांमधून काढण्यासाठी व जमा करण्यासाठी रांगेत उभे रहावे लागले होते. यात काहींचा मृत्यू झाला होता. यावरून राजकीय टीका सुरु झाल्या होत्या. नोटबंदीने लोकांना त्रास झाला आहे. याचा बीजेपी पक्षाला तोटा होईल असे राजकीय नेत्यांना आणि अन्य तज्ञांना वाटत होते पण त्यांचा अंदाज चुकीचा ठरवत बीजेपी ने उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये विजय मिळवला. तर कॉंग्रेस पक्ष संपत आला आहे असे वाटत असताना कॉंग्रेसने चांगली कामगिरी करत पंजाब मध्ये विजय मिळवला. गोवा, मणिपूर मध्येही कॉंग्रेसला लोकांनी मत दिले आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीकडे आणि 2017 च्या पाच राज्यातील निवडणुकीकडे पाहिले तर एक गोष्ट स्पष्ट होते कि लोकांनी स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी पसंती दिली आहे आणि त्या दृष्टीकोनातूनच कॉंग्रेसला पंजाब मध्ये तर बीजेपीला उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये बहुमत दिले आहे. नोटाबंदीच्या विषयचा सर्वात जास्त उल्लेख करुन बीजेपीला घेरण्याचा प्रयत्न पूर्णपणे सफल ठरला नाही. या निवडणुकीत हे ही जाणवले कि 2014 प्रमाणे नरेंद्र मोदी हेच बीजेपीचे दिग्गज नेते आहेत. नरेंद्र मोदी यांनी एकट्याच्या बळावर बीजेपीला उत्तर प्रदेश मध्ये 14 वर्षांनी सत्ता मिळवून दिली. दुसरीकडे कॉंग्रेसला लोकसभा पराभवानंतर पंजाब मधील विजय खूप आनंद देणारा आहे.
बीजेपी आणि कॉंग्रेसच्या विजयाने स्थानिक राजकीय पक्षांना तोटा सहन करावा लागला. उत्तरप्रदेश मध्ये समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पक्ष यांना बीजेपीने धक्का दिला. उत्तर प्रदेश मध्ये समाजवादी पक्षाच्या तुलनेत बहुजन समाजवादी पक्षाला सर्वात जास्त बीजेपीचा धक्का लागला. पंजाब मध्ये कॉंग्रेसने शिरोमणी अकाली दल आणि बीजेपीला पराभूत केले. यावेळी लोकांनी कॉंग्रेसवर विश्वास दाखवला आहे. उत्तर प्रदेशातील 403 पैकी तब्बल 312 जागी भाजपचे कमळ फुलले आहे. तर, उत्तराखंडातील 70 पैकी 57 जागी भाजपचे कमळ फुलले. पंजाब मध्ये 77, गोव्यात 17 आणि मणिपूर मध्ये 28 जागी कॉंग्रेसने हाताची ताकत दाखवली आहे.
2017 च्या पाच राज्यातील महत्वाच्या निवडणुकांनी राजकीय पक्षांना बरेच काही शिकायला मिळाले असेल. बीजेपी आणि कॉंग्रेस दोन्ही पक्ष जेथे जिंकले आहेत तेथील लोकांचा विश्वास आहे, त्यांना अपेक्षा आहे कि हे दोन्ही पक्ष लोकांच्या निर्णयाला योग्य ठरवत त्यांच्यासाठी काम करतील. लोकांच्या अपेक्षा, लोकांचा विश्वास बीजेपी आणि कॉंग्रेस पूर्ण करतात काय हे येणाऱ्या काळातच कळेल
Comments
Post a Comment